Monday, 3 August 2015

सोहळे नात्यांचे

कालच 'friendship day'  झाला.  'मैत्री' बद्दल खुप काही लिहिल, बोलल, व्यक्त केल गेल.  हल्ली father's day,  mother's day, valentine day असे विविध नात्यांचे सोहळे साजरे केले जातात शिवाय  rose day,  chocolate day,  ....... आणि असे अगणित days साजरे केले जातात.  काहींच्या मते, हे एक  fad आहे.  पाश्चात्यांच केलेल अंधानुकरण आहे.  " आमच्या काळी नव्हती हो असली थेर !", " आम्हाला नाही वाटली आपल्या नात्यांची प्रदर्शन करायची गरज!", हे आणि असे बरेच शेरे , ताशेरे जुन्या पिढीकडून ऐकायला मिळतात. त्यातही तथ्य नाही अस नाही ! 
          आपल्या कडे म्हणजे आपल्या संस्कृतीत , बहुतांश  नाती,  'गृहीत ' धरली   जातात.  आत्तापर्यंत , एखाद्या नात्यात अभिप्रेत असलेल्या भावना , आवर्जून , वेगळ्या, व्यक्त करायची गरज भासत नव्हती. कारण, त्या  कृतीतून व्यक्त केल्या जाण्याइतकी  त्या नात्यांमध्ये  सहजता होती आणि सहवासही  होता ! पण गम्मत अशी आहे, कि कृतीतून कितीही व्यक्त झाल्या तरी काही भावना , समोरच्या ' आपल्या ' माणसाने , शब्दातूनही बोलून दाखविल्या कि मिळणार समाधान केवळ शब्दातीत असत ! जसा पोकळ शब्दांना अर्थ नाही तसाच नुसत्या यंत्रवत कृतींनाही ! त्यामुळे हि, 'भावनांचे  सोहळे ' साजरे करण्यातही वेगळी नजाकत आहे ! निष्तेज  होऊ पाहणाऱ्या नात्यांमध्ये , पुन्हा एकदा नव्याने रंग भरण्याची , नव्या पिढीची हि एक अदा आहे , अस म्हणायला हरकत नाही.  
             परंतू  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आधुनिकीकरण आणि गतीमानाशीलता हे आजच्या जीवन पद्धतीचे अविभाज्य घटक झाले आहेत . कुणालाही  इथे कशासाठीही थांबण अशक्यप्राय झालंय.कारण ' थांबला तो संपला ' !  एवढ मात्र नक्की , माणसांमध्ये नाती , जिव्हाळा अजूनही आहे. फक्त त्याची  स्वरूप बदलली. कृतीतून दाखवण्याच्या वेळेअभावी , ती व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पध्दती  अवलंबण्यात आल्या . मग पाश्चात्यांप्रमाणे एखादा विशिष्ठ दिवस, एखाद्या विशिष्ट्य नात्यासाठी  मुकर्रर करून, त्या विषयीची आपली भावना व्यक्त व्हायला सुरुवात झाली. पण त्यालाही ठराविक मर्यादा होत्या. कारण greeting cards , gifts या सारख्या माध्यमासाठी  होणारा आर्थिक भार उचलण , प्रत्येकाला शक्य नव्हत. परंतु म्हणतात न ' गरज हि शोधाची जननी आहे!' technology develop होत राहिली , आणि social media हे एक अत्यंत सहज सुंदर , सोयीस्कर माध्यम, सर्वसामान्यांच्या  हाती लागलं. Everything and everybody became accessible ,with a click of a button !' ' copy paste ' , ' forward ' केलं , कि तीच एक भावना, असंख्य लोकांपर्यंत निमिषात पोहोचवू शकतो ! technology ची केव्हढी हि किमया ! 
नात्यांची परिभाषाच बदलली ! Everybody, who crosses  our path , becomes a 'buddy' ! रोज नवीन नाती तयार होतात. ज्यात 'commitment' या शब्दाची गरज देखील नाही. उलट ' गरजेपुरतच नात ' , हि संकल्पना रुजत चालली. जेव्हढ्या सहजतेने जुळतात, तेव्हढ्याच सहजतेने संपतातही ! & people ' move on '! कुठलाही खेद , दुःख न बाळगता , नवीन नात्याच्या शोधात! आणि मग या सगळ्या नात्यांच्या रामरगाड्यात , खरी , जवळची , नाती जपायला वेळ कुणाला आहे ? म्हणून मग हे ' days ' ' celebrate ' करण सोयीस्कर होत! वर्षातून एक दिवस त्या नात्याचा ' सोहळा ' केला कि उरलेले ३६४ दिवस परत आयुष्याच्या मागे, मनात कोणतीही अपराधी भावना न बाळगता , धावायला मोकळे ! शिवाय रोजच्या चकोरिबद्द , ' boring' आयुष्यात, तेव्हढाच थोडासा ' time pass '! नाही का ?
……………………. निलिमा देशपांडे. 

1 comment:

  1. पटलं.....की fast life मध्ये ३६५ दिवसात त्या निमित्ताने तरी नाती गोती टिकवायला (permenent or temporary ) अश्या थेरांची गरज वाटावी आणि त्यात आता तुझा blog वाचल्या नंतर काहीच चुकीचं नाही हे खरंच पटलं

    ReplyDelete